सीमा भागातील बेरोजगार आणि पिचलेल्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार!
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती संघटने कडून रोजगार मेळाव्याचे आयोजन लवकरच!

निपाणी नगरी प्रतिनिधी (5)
महाराष्ट्र कर्नाटक सीमा खटला 2004 पासून न्यायप्रविष्ट असल्याने येथील तरुण वर्ग बेरोजगारीत होरपळतोय. सीमा भागातील बेरोजगार आणि पिचलेल्या तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे काम महाराष्ट्र एकीकरण युवा समिती संघटनेने मागील दोन वर्षांपूर्वी केले होते. महाराष्ट्र शासनाकडून 1700 तरुण वर्गाला रोजगाराची संधी देण्याचे यश संघटनेला मिळाले. तसेच महाराष्ट्र सरकार आपल्या सीमाभागातील तरुणांसाठी अविरत काम करीत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले होते, काही कारणास्तव मागील काही अपरिहार्य कारणामुळे रोजगार मेळावा होऊ शकला नाही याची खंत होती. पण या वर्षी रोजगार महामेळावा घेण्यासाठी अवितर काम करीत, नेत्यांच्या भेटीगाठी घेत पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत.
खासदार धर्यशील माने, कोल्हापूर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना हा प्रस्ताव अगोदरच कानावर घातला होता. त्यांनीही सहमती दर्शवली होती. त्यानंतर काल मंगळवार दिनांक ४/२/२०२५ रोजी संघटने मार्फत मुबई दौरा करून महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सावंत यांची भेट घेतली. निपाणी सीमाभागातील रोजगार मेळावा घेण्या करिता निवेदन देण्यात आले. अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील बोलताना म्हणाले मागील रोजगार मेळाव्यात दरवर्षी सीमाभागात तरुण वर्गासाठी रोजगार मेळावा घेण्याचे अभिवचन दिले होते ते पाळावे यासाठी विनंती केली. यावर लवकरच हालचाली सुरू करून पुढची बैठकीची तारीख तुम्हाला लवकरच कळवली जाईल असे आश्वासन दिले. यावेळी जयराम मिरजकर, लक्ष्मीकांत पाटील, कपिल बेलवळे,अमर विटे हजर होते.