Entertainmentआपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

रणजीत मगदूम यांचा संघ ठरला अरिहंत चषकाचा मानकरी!

नारायणवाडीच्या "ऋषिकेश वॉरियर्सचा" विजयी झेंडा, संयोजित उर्फ निकू पाटील यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले!

Kiran Gopalrao Patil M,88884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (16)

“अरिहंत चषक पर्व २ : ऋषिकेश वॉरियर्स नारायणवाडीचा विजयी झेंडा, रणजीत मगदूम यांचे प्रायोजन आणि संयोजित उर्फ निकू पाटील यांचे संघटन ठरले यशाचे गमक”

निपाणीचे रणजीत मगदूम प्रायोजित (नारायणवाडी संघाची) सलग दुसरी विजयी घोडदौड कायम ठेवत निपाणी व्यायाम शाळेच्या मैदानावर नुकतीच ‘अरिहंत चषक – पर्व 2’ ही भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यांतील तब्बल 30 संघांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रत्येक सामन्यातील चुरस इतकी जबरदस्त होती की प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धाव निर्णायक ठरत होती. स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत निपाणी, कोल्हापूर, जयसिंगपूर आणि रणजीत मगदूम प्रायोजित नारायणवाडी संघ या चार संघांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. उपांत्य सामन्यात निपाणी विरुद्ध कोल्हापूर असा रोमांचक सामना झाला, ज्यामध्ये कोल्हापूर संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात रणजीत मगदूम नारायणवाडी संघाने जयसिंगपूर संघाचा पराभव करत अंतिम फेरी गाठली.  

अंतिम सामन्यात एकीकडे कोल्हापूर संघात राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू नितीन माटुंगे होते, तर दुसरीकडे रणजीत मगदूम यांच्या संघात राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू विजय पावले होते. विजय पावले यांनी ISPL, सुप्रीमो सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे ही ‘सुपरस्टार्सची टक्कर’ निपाणीतील क्रिकेटप्रेमींना एक पर्वणी ठरली. कोल्हापूरने प्रथम फलंदाजी करत 8 षटकांत 66 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना विजय पावले यांनी झंझावाती खेळ करत सामना आपल्या संघाकडे झुकवला होता. मात्र त्यांचा बळी गेल्यानंतर कोल्हापूर संघाने पुन्हा खेळात आघाडी घेत सामना आपल्या बाजूकडे वळवला. रणजीत मगदूम संघाला अंतिम षटकात विजयासाठी 18 धावांची गरज असताना, मयूर कुंभार यांनी दोन उत्तुंग षटकार मारून सामना पुन्हा नारायणवाडी संघाच्या बाजूने वळवला. अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना त्या धावा घेत संघाने अतिशय चुरशीच्या लढतीत विजय निश्चित केला. सलग दुसऱ्या वर्षी रणजीत मगदूम यांचा नारायणवाडी संघ ‘अरिहंत चषक’चा मानकरी ठरला. विजयानंतर विजय पावले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, “निपाणी हे क्रिकेटप्रेमी रसिकांनी भरलेले शहर आहे. येथे खेळण्याचा आनंद काही औरच असतो.” त्यांनी निपाणीमध्ये आल्यावर सर्वप्रथम निपाणी टाऊन प्लॅनिंगचे चेअरमन श्री संयोजित ऊर्फ निकू पाटील यांना घरी जाऊन भेट दिली. नारायणवाडी संघासह त्यांनी त्यांच्या चिरंजीवाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि आजची विजयी ट्रॉफी त्यांनी शशांक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ समर्पित केली, हे सांगताना ते भावूक झाले. बक्षीस वितरण सोहळा मा. उत्तम रावसाहेब पाटील, मा. अभिनंदन रावसाहेब पाटील, डॉ. दीक्षित, विद्यमान नगरसेवक श्री शौकतअली मणेर तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते पार पडला. ट्रॉफीचे मानकरी निपाणी टाऊन प्लॅनिंगचे चेअरमन संयोजित ऊर्फ निकू पाटील व रणजीत मगदूम प्रायोजित ‘नारायणवाडी’ संघ आणि लक्षवेधी आयकॉन खेळाडू विजय पावले यांनी मिळून विजयी चषक उंचावला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!