ताज्या घडामोडी

तक्रार निवारन केंद्रामुळे लोकांच्या तक्रारी जागेवर सुटण्यास मदत होणार – सहाय्यक पोलिस अधिक्षक नवनीत कांवत

लोणावळा : तक्रार निवारन केंद्रामुळे लोकांच्या तक्रारी जागेवर सुटण्यास मदत होणार असल्याने यापुढे दर बुधवारी व गुरूवारी तक्रार निवारण दीन घेण्यात येणार आहे असे सहाय्यक पोलिस अधिक्षक नवनीत कांवत यांनी आवाज प्रतिनिधीशी बोलताना सांगितले .

लोणावळा येथील कृष्णाई रिसाॕर्ट येथे आयोजित केलेल्या तक्रार निवारण केंद्रावर आज नागरिकांची फारशी गर्दी नसली तरी गणेशोत्सवाच्या काळात प्रतिसाद बरा आसल्याचे दिसले.जास्त प्रसिद्धी नसल्याने लोकही कमी प्रमाणात आल्याचे पहायला मिळाले.
अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली हा तक्रार निवारण दिवस संपन्न झाला.

यावेळी माध्यमांशी बोलताना सहाय्यक पोलिस अधिक्षक व लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी नवनीत कांवत म्हणाले ,तक्रार निवारण केंद्र सुरू केले असून यामधे वरिष्ठ पोलिस आधिकारी विवेक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली हे तक्रार निवारण केंद्र अधिकारी व कर्मचारी नागरिकांची तक्रार निकाली काढत आहेत.लोकांनी एकञ यावे , त्यांच्या तक्रारीचे निवारण जागच्या जागी करता यावे , लोकांना न्याय मिळण्यासाठी उशीर होऊ नये ,असा उद्देश यामागे आहे. यासाठी हे केंद्र आज घेतले आहे.यापुढे दर बुधवारी व गुरूवारी हे केंद्र हा दिवस पाळण्यात येणार आहे, असे कावत म्हणाले .

यावेळी लोणावळा शहरचे पोलिस निरिक्षक दिलीप पवार आणि त्यांचे सहकारी तसेच लोणावळा ग्रामिणचे पोलिस निरिक्षक प्रविण मोरे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.यावेळी दहाला आलेले नागरिक यांना तीन पर्यत थांबावे लागत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

या बाबत जनजागृती झाली असती व सणासुदीचे दिवस नसते  तर गर्दी वाढली असती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मास्कचे वापर व सॕनिटायझर यांचा तसेच सोशल डिस्टंटीँगचे नियम पाळले जात असल्याने व काळजी घेतली जात असल्यामुळे तक्रार निवारण करताना विलंब होत असल्याचे दिसले.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!