ताज्या घडामोडी
समाधानकारक पावसामुळे मावळसह पिंपरी-चिंचवड करांची तहान मिटली
तळेगाव : मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे मावळ वासियांसह पिंपरी-चिंचवडकरांची तहान मिटली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.सध्या धरणात 96.62 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे मावळसह पिंपरी-चिंचवडकरांचा पाणी प्रश्न मिटला आहे.
जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे धरण 85 टक्के भरले होते. त्यामुळे धरणातून 29 जुलै रोजी 3500 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
पवना धरण पाणलोट क्षेत्रातील समाधानकारक पावसामुळे मावळसह पिंपरी-चिंचवडकरांची चिंता मिटली आहे.