ताज्या घडामोडी
देशात वीजटंचाई ; राज्यावर भारनियमनाचे संकट
मुंबई : देशातील औष्णिक वीज प्रकल्पात सरासरी चार दिवस पुरेल इतका कोळसा साठा शिल्लक आहे.कोळश्याच्या तुटवड्यामुळे मागील 4 दशकातील सर्वात मोठे वीज संकट देशासमोर उभे राहिले आहे. देशात वीजटंचाई व राज्यात भारनियमनाची दाट शक्यता आहे.
वाढत्या तापमानामुळे विजेच्या मागणीत वाढ होत आहे. परिणामी विजेची मागणी व उपलब्धता यातील तफावत भरून काढण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत.
कोळश्याच्या तुटवड्या अभावी औष्णिक वीज केंद्रामध्ये वीज निर्मितीमध्ये लक्षणीय घट सुरू आहे. विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. विजेचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.