ताज्या घडामोडी

बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे .5 आणि 7 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आल्याने हे दोन पेपर लांबणीवर पडले आहेत.

5 व 7 तारखेचे भाषा विषयांचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. इयत्ता बारावीची परीक्षा 4 मार्च रोजी सुरू होणार आहे. परंतु 5 मार्च रोजी होणारा पेपर 5 एप्रिलला ते 7 मार्च रोजी होणारा पेपर 7 एप्रिलला होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काल पुणे-नगर मार्गावर पुण्याच्या दिशेने येत असताना एका ट्रकला आग लागली होती. या ट्रकमध्ये बारावीच्या प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्याची घटना घडली. प्रश्नपत्रिका याच विषयांच्या असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे  बोर्डाला बारावीच्या वेळापत्रकात बदल करावा आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!