ताज्या घडामोडी

प्रतापगडाप्रमाणे लोहगडावरील अतिक्रमण हटवावे; शिवभक्तांची मागणी..

 प्रतापगडाप्रमाणे लोहगडावरील अतिक्रमण हटवावे; शिवभक्तांची मागणी

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २२ नोव्हेंबर :

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या लोहगड किल्ल्याच्या चहूबाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. किल्ल्यावर असलेल्या दर्ग्यात व त्याच्या आजूबाजूला वाढलेले अतिक्रमण हे जणू किल्ल्यालाच गिळंकृत करु पाहत आहे. या संदर्भात विविध संघटनांनी पुरातत्व विभागाला माहिती दिली असून पुरातत्त्व विभाग कुठलेही ठोस पाऊल उचलण्यास उदासीन असल्याचे दिसून येत आहे.

तसेच किल्ल्यावर असलेल्या या दर्ग्या संदर्भात इतिहात कसलाच उल्लेख नसल्याचे इतिहास संशोधकांचे म्हणणे आहे. या दर्ग्यात आता कबरी दिसून येत आहेत. मात्र या कबरी आल्या कुठून असा प्रश्न शिवभक्तांना पडला आहे. शिवछत्रपतींच्या किल्ल्यावर दर्गा व कबरिंनी केलेले अतिक्रमण आणि त्याची वाढती संख्या यामुळे शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळत आहे. त्यामुळे नुकत्याच प्रतापगडावर झालेल्या कारवाईप्रमाणे मावळातील लोहगड किल्ल्यावर देखील अतिक्रमण विरोधात कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आणि जर लवकरात लवकर यावर कारवाई झाली नाही, तर शिवभक्तांनी जन आंदोलनाचा इशारा दिला आहे. याकडे पुरात्च विभाग कशा प्रकारे पाहते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, पवन मावळात असलेला लोहगड किल्ला पाहण्यासाठी व छत्रपती शिवाजी महाराज तसेच स्वराज्य निर्मितीसाठी प्राणाची बाजी लावलेल्या मावळ्यांना अनुभवण्यासाठी राज्यभरासह देश विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. मात्र लोहगडावर गेल्या काही वर्षांपासून दर्ग्याचे, कबरींचे व त्याच्या चहुबाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. अनेक हिंदू संघटना, इतिहास प्रेमी, व शिवभक्तांनी एकत्र येऊन हे अतिक्रमण हटवावे या संदर्भात वारंवार आवाज उठवला आहे. मात्र पुरत्व विभागाने याची दखल मात्र घेतलेली नाही.

लोहगड किल्ल्यावरती दर्ग्याच्या बाजूला जत्रा भरली जात होती. या जत्रेच्या काळात दिवस-रात्र किल्ल्याचे दरवाजे उघडे ठेवले जात असे. या काळात गडावर मोठ्या संख्येने लोक लोहगडावरती उपस्थित राहत असतात. यामुळे होणारा कचरा व घाण यामुळे पिण्याचे पाणी अशुद्ध होत होते. गडाचे पावित्र्य राखले जात नव्हते. या संदर्भात बातम्या आल्यानंतर तसेच शिवभक्तांनी मोठ्या संख्येने विरोध केल्यानंतर पुरात्व विभागाने याची दखल घेत गडावरील प्रकारावर काही निर्बंध घातले आहे. तसेच लवकरात या अतिक्रमनाबाबत पुरातत्व विभागाने याची दखल घ्यावी, अशी मागणी नागरीकांनी केली आहे.

लोहगडावरील अतिक्रमणाबाबत छत्रपती संभाजी राजेंनी केली चिंता व्यक्त

काही दिवसांपूर्वी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या कबरच्या आजूबाजूचे अतिक्रमण हटवण्यात आले. असून या गोष्टीचे स्वागत स्वतः छत्रपती संभाजी राजे यांनी राज्य सरकारचे आभार व्यक्त केले आहे. त्याचवेळी त्यांनी ट्विटर मार्फत लोहगड तसेच विशाल गडावरील अतिक्रमण संदर्भात चिंता व्यक्त केली आहे. तसेच हे अतिक्रमण लवकरात लवकर हटवावे अशी मागणी ही त्यांनी केली आहे.

गडावर दिशा फलक व गडाच्या माहितीचा आभाव; पुरातत्व विभागाचे गड किल्ल्यांकडे दुर्लक्ष

लोहगड किल्ल्यावरती पुरातत्त्व विभागाचे अधिकारी असून त्या ठिकाणी किल्ल्यावरती जाण्यासाठी तिकीट आकारले जाते. परंतु लोहगड किल्ल्यावरती पर्यटकांसाठी कोणत्याच प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीत. स्वच्छतागृह नाहीत. तटबंदीच्या कडेला जे लोखंडी रॉड लावले आहेत, तेही तुटलेले आहेत तसेच दिशा फलक देखील नाहीत.

लोहगड किल्ल्यावर सुरुवातीला जाताना पायऱ्यांनी वरती गेल्यानंतर महादेव मंदिर समोर दिसते. मात्र इथून पुढे जायचं म्हटलं की कोणत्या बाजूला जायचं व कोणत्या बाजूला काय आहे हे दर्शवणारे दिशा फलक तुटलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात. किल्ल्याचा इतिहास व माहिती काय आहे.. काय नाही..? हे आपल्याला गडावर गेल्यावर ही समजून येत नाही. तर गडावर गडाची माहिती देणारे व तुटलेले फलक लवकरात लवकर बसवावे अशी मागणी पर्यटकांनी केली आहे.

लोहगड या मावळ तालुक्यातील दुर्गावर एक दर्गा बांधण्यात आला. त्यास एकही ऐतिहासिक संदर्भ नाही. प्रतिवर्षी याच्या आकार, रचना व रंगात बदल दिसून येतो. शिवकाळ ते ब्रिटिश काळ आणि भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत येथे दर्गा असल्याचा कोणताच प्राथमिक पुरावा नसल्याने सदर दर्गा हा नव्याने स्थापन करण्यात आला असल्याचे निदर्शनास येते. येथील उरूसाची मोठी परंपरा असल्याचे जे सांगतात त्यांनी एखादा तरी पुरावा उपलब्ध करून द्यावा असे मी आवाहन करत आहे…
– डॉ. प्रमोद बोराडे (इतिहास संशोधक)

 

छत्रपती शिवाजी महाराजांचे हे दुर्ग पराक्रमी इतिहासाचे साक्षी आहेत. या दुर्गांवर हे धर्मांध लोक मजारी बांधुन  अतिक्रमण करत आहेत व दिवसांगणीत ही मजारे वाढतच आहेत. ज्यांचा इतिहासात कुठेही उल्लेख नाही. सरकारने ही अतिक्रमणे त्वरित जमीनदोस्त केली पाहिजेत. ही अतिक्रमणे न काढल्यास बजरंग दल संपूर्ण महाराष्ट्रात मोठे जनआंदोलन उभे करेल.
– संदेश भेगडे (विभाग संयोजक, बजरंग दल)  

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!