ताज्या घडामोडी
इंद्रायणी महाविद्यालयाचा बारावीचा निकाल शंभर टक्के
तळेगाव : इंद्रायणी महाविद्यालयाचा यंदाचा बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हिसी या चारही शाखांचा निकाल १०० टक्के असून चारही शाखांमधून विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे.
विज्ञान शाखेतून जानवी श्रीपाद भिडे ९९ टक्के गुण मिळवून, कला शाखेतून नितूकुमारी रूपाराम भाल ८६.५० टक्के गुण मिळवून, वाणिज्य शाखेतून साक्षी अंकुश गराडे ९४.३३ टक्के मिळवत तर लक्ष्मी ईश्वर नारायणकर ७५.३३ टक्के गुण मिळवत या विद्यार्थीनी महाविद्यालयात अव्वल आल्या आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे विश्र्वस्त,मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी अभिनंदन केले आहे.