गढूळ पाणीपूरवठयाने औंढोली ग्रामस्थ ञस्त
लोणावळा : पवना धरणातून होणाऱ्या पाण्याचा पुरवठा शुध्द स्वरूपात होत नसल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. गढूळ पाणी नळाला आल्यामुळे औंढोली ग्रामस्थ ञस्त आहेत. काहींना बिसलेरी पाणी विकत आणून पिण्यासाठी तात्पुरती सोय केली आहे. काहींनी शिळेपाणी तसेच पाणी गरम करून गाळून घेवून पिण्यासाठी वापरावे लागत आहे.
औंढोली येथे पाच पाच दिवसातून पाणी येते . ग्रामपंचायतीचे सरपंच ,ग्रामविकास अधिकारी यांनी लक्ष घालावे आणि स्वच्छ व पुरेशा दाबाने गावातील सर्व घरांना पाणीपुरवठा करावा. धरण उशाला आणि कोरड घशाला ,आसा प्रत्यय या गावाच्या पाणीपुरवठ्याबाबत येत आहे. ग्रामस्थांची व महिलांची मागणी लक्षात घेवून ग्रामपंचायतीचे वतीनै सुरळीत पाणीपुरवठ्याबाबत योग्य ती यंञणा राबवावी व तसे कर्मचारी व जीवन प्राधिकरणचे आधिकारी यांना आदेश द्यावेतअशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.