ताज्या घडामोडी
‘या’ तारखेपासून राज्यातील महाविद्यालय सुरू होणार
मुंबई : येत्या 20 ऑक्टोबर पासून राज्यातील महाविद्यालये सुरू होणार आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार आहे अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
महाविद्यालय सुरू करण्याबाबत प्रत्येक जिल्ह्यात वेगळी नियमावली असेल. एक डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवावी असे निर्देश दिले आहेत असे सामंत म्हणाले.
ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये हजर राहणे शक्य नसेल त्यांच्यासाठी कॉलेजने ऑनलाईन शिक्षणाची सोय करावी. ज्या विद्यार्थ्यांनी डोस घेतलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात कॅम्प घेऊन लसीकरण करावे. टप्प्याटप्प्याने वसतिगृह सुरू करावीत असे निर्देश देण्यात आले आहेत.