ताज्या घडामोडी

अंदर मावळातील 2 हजार नागरिकांनी घेतला शासन आपल्यादारी योजनेचा लाभ

मावळ : आंदर मावळातील 25 गावातील दोन हजार नागरिकांनी शासन आपल्या दारी या योजनेचा लाभ घेतला. वडेश्वर येथील आश्रम शाळेत 12 ते 14 ऑक्‍टोबर दरम्यान ही योजना राबविण्यात आली.

यावेळी आदिवासी समाजाच्या सुमारे 300 च्या वर नागरिकांना जात प्रमाणपत्र दाखले, अर्ज देण्यात आले. त्याचबरोबर आधार कार्ड दुरुस्ती, नवीन आधार कार्ड, रेशन कार्ड वरील नाव कमी करणे, नाव लावणे, नवीन कार्ड घेणे तसेच उत्पन्नाचे दाखले या योजनेद्वारे नागरिकांना आपल्या गावातच उपलब्ध झाले. यावेळी नागरिकांनी विविध खाते निहाय माहिती व अर्ज भरले.

खासदार श्रीरंग बारणे व शिवसेना तालुकाप्रमुख राजेश खांडभोर यांच्या प्रयत्नातून ही योजना राबवण्यात आली. या ठिकाणी मावळ तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे, नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, महिला बालकल्याण अधिकारी विशाल कोतागडे, कृषी अधिकारी दत्ता पडवळ, टाकवे बीट आरोग्य अधिकारी डॉ. साठे आदी उपस्थित होते.

 

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!