ताज्या घडामोडी

भांगरवाडी रेल्वेगेटवर वाहनचालकांचा खोळंबा

कधी होणार उड्डाणापूल ?असा नागरिकांचा प्रश्न

लोणावळा : भांगरवाडी रेल्वेगेटवर वाहनचालकांचा खोळंबा  होत असून येथे कधी होणार उड्डाणापूल , असा नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे.

उड्डाणपूलाकरीता लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने रेल्वेला काही कोटी रक्कम देण्यात आली आहे. जागाही संपादन करण्याची प्रक्रिया झाली आहे.माञ रेल्वेगेटवर तासनतास थांबावे लागत असल्याने वाहनचालकांनी या उड्डाणापूलाचे काम कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राज्याचे उपमुख्यमंञी लोणावळ्यात आलेले आसताना  हा मुद्दा लोणावळ्याच्या मुख्याधिकारी यांनी उपस्थित केला नाही.तसेच नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव याही कार्यक्रमाला  अनुपस्थित राहिल्याने हा प्रश्न आनुत्तरीत राहिला .लोणावळ्याच्या नगराध्यक्षा प्रत्यक्ष या कार्यक्रमाला आवर्जून लोणावळ्याच्या प्रथम नागरिक म्हणून उपस्थित राहिल्या असत्या तर उपमुख्यमंञी .पवार यांनी आणखी निधी या रेल्वेवरील उड्डाणापूल कामाकरीता जाहीर केला असता,असे काही नागरिकांकडून लक्ष वेधण्यात आले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!