ताज्या घडामोडी
महाराष्ट्रात बैलगाडा शर्यती संदर्भात सकारात्मक निर्णय होईल – डॉ. अमोल कोल्हे
मुंबई : महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीवर असलेली बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर 15 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने 2017 साली बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली होती. ती आत्तापर्यंत कायम आहे. ही बंदी उठवावी व बैलगाडी शर्यती राज्यात पुन्हा सुरू कराव्यात यासाठी बैलगाडा संघटना व महाराष्ट्र सरकारच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे बैलगाडा शर्यती संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असताना महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती संदर्भात सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.