मुंबई : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकांचे गाव सुरू करण्यास काल (15 डिसेंबर ) रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
भिलारच्या धर्तीवर पुस्तकाचे गाव ही योजना राज्य मराठी विकास संस्थेच्या स्तरावर स्वतंत्रपणे उपक्रम म्हणून राबवण्यात येईल.पहिल्या टप्प्याच्या महसुली विभागात आणि नंतर दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव सुरू करण्यात येणार आहे.