ताज्या घडामोडी

महाशिवरात्रीनिमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी या संस्थेच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम

तळेगाव :  संपूर्ण देशात केंद्र शासनाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली‌ सुरू असलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत  तळेगाव स्थित प्रजापिता ब्रह्मकुमारी या संस्थेच्या माध्यमातून महाशिवरात्रीनिमित्त आज सकाळी शहरात स्वच्छता मोहीम  राबविण्यात आली .

तळेगाव स्टेशन केंद्राच्या मुख्य  प्रभादीदी व मीनादीदी आणि त्यांच्या सर्व सहका-यांनी तळेगाव स्टेशन येथील आनंद नगर येथे परिसरात स्वच्छता जागृती अभियान प्रभातफेरीच्या माध्यमातून सुरु केले.यासाठी आनंद नगर तळेगाव स्टेशन येथे जनजागृतीसाठी प्रभात फेरी काढण्यात आली.

तळेगाव स्टेशन येथील ब्रह्मकुमारी केंद्रात सर्वप्रथम प्रभादीदी आणि मीनादीदीच्या शुभहस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी रोटरीक्लब तळेगाव दाभाडे सिटीचे माजी अध्यक्ष  विलास काळोखे यांनी शुभेच्छा देताना आपल्या आंतरराष्ट्रीय रोटरीक्लबच्या माध्यमातून होणाऱ्या सामाजिक कार्याची माहिती उपस्थितांना दिली. त्यानंतर लायन अध्यक्ष  दिपक बाळसराफ यांनीही आपल्या लायन्स आंतरराष्ट्रीय संघटनेच्या विविध उपक्रमाची माहिती देत असताना आपला केलेला सन्मान या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ज्येष्ठ लायन् सदस्य डॉ.शाळीग्राम भंडारी यांनी या उपक्रमाच मनापासून स्वागत आणि कौतुक केल.वैद्यकीय शास्त्रात आजार होण्याअगोदरच जर तो होऊ नये याची काळजी आपण घेतली तर खऱ्या अर्थाने आरोग्यसंपन्न समाज निर्माण येईल असे मत प्रदर्शित केले.त्यासाठी आपण हे जे कार्य करीत आहात त्याबद्दल केंद्राच नेतृत्व करणाऱ्या प्रभादीदी व मीनादीदी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच मनापासून अभिनंदन केलं. त्यांच अभिष्टचिंतन केलं.

भविष्यकाळात लायन्स व रोटरीक्लब कडून जिथे जिथे मदत आपल्याला हवी असेल तिथे तिथे विनाविलंब त्या प्रकारची मदत आपणास उपलब्ध करून देण्यात येईल असे अभिवचन दिले. त्यानंतर अत्यंत उत्साहात स्वच्छता मोहिमेसाठी प्रत्यक्ष कृती आणि जनजागृतीसाठी प्रभात फेरीची सुरुवात झाली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!