ताज्या घडामोडी
राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाचा इशारा
पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे राज्याच्या हवामानावर परिणाम होत आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात हलका पाऊस तर काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट होण्याची चिन्हे आहेत अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
मुंबईतील हवामान अंशतः ढगाळ राहील. तर पुणे, नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, सोलापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यातच आता अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.