मी ठरवलं की नंबर वन येतोच ; फडणवीसांचं पुन्हा आघाडीला आव्हान
तीन मार्कशीट जुळवून पहिले आल्याचाही टोला
मावळ : पाच राज्यातील निवडणूक निकालात मोठे यश मिळाल्यानंतर भाजप नेते सतत महा विकास आघाडी डिवचत आहेत.आज देवेंद्र फडणवीस मावळ तालुका बैलगाडा शर्यतीला आले होते.त्यांनी यावेळी बोलताना पुन्हा महाविकास आघाडी विरोधात जोरदार टोलेबाजी केली. मी ठरवले की नंबर वन येतोच मात्र महा विकास आघाडीचे नेते तीन मार्कशीट जुळून पहिले आले असा खोचक टोला फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लगावला.
फडणवीस यांनी यावेळी बोलताना सर्वांचे आभार मानले. त्यानंतर शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या बैलाचे देखील आभार मानले. बैलगाडी शर्यतीवर बंदी आणणा-यांनी मावळात येऊन पहावे. आपल सरकार आला आणि आम्ही प्रयत्न करत बैलगाडा शर्यत सुरू केली .मात्र ही मंडळी पुन्हा कोर्टामध्ये गेली आणि बंदी आणली. मी त्यावेळी एक समिती निर्माण केली आमी बैल एक धावणारा प्राणी आहे म्हणून कागदपत्रे कोर्टामध्ये देत ही बंदी उठवली असा दावाही यावेळी फडणवीस यांनी केला.
मला आज आनंद आहे, माझा बैलगाडा इथे धावला. पहिला नंबर आला. 2014 आणि 2019 ला देखील जनतेने आम्हाला पहिल आणलं पण काहींनी शाळा केली. मावळच्या धर्तीवर ज्याचा बैलगाडा पहिला येतो तो कधी मागे हटत नाही असे सूचक वक्तव्य करत त्यांनी महाविकास आघाडीला आव्हान दिलंय.