नगरपालिका निवडणूकींबाबत भाजपाने निवडणूक आयोगाकडे केली ‘ही’ मागणी
ओबीसी आरक्षण आणि पाऊसाचे कारण देत ह्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी होत आहे.
नगरपालिका निवडणूकींबाबत भाजपाने निवडणूक आयोगाकडे केली ‘ही’ मागणी
आवाज न्यूज : मुंबई प्रतिनिधी ll राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 92 नगरपालिका आणि 4 नगरपंचायत निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार, 18 ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार असून 19 ऑगस्ट रोजी निकाल लागण्याची शक्यता आहे. मात्र, आयोगाच्या घोषणेनंतर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुका पुढ ढकलण्यासंदर्भात मागणी केली आहे. ओबीसी आरक्षण आणि पाऊसाचे कारण देत ह्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात आज भाजप नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे.
राज्यात सर्वदूर पडणारा पाऊस, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर येणारा ताण तसेच ओबीसी राजकीय आरक्षणाचा अनुत्तरित प्रश्न लक्षात घेता नगरपालिका निवडणुका पुढे ढकला, असं निवेदन राज्य निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांना भाजपच्यावतीने देण्यात आल. यावेळी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते.