महिन्याच्या आत पवना धरणग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावा, नाहीतर धरणाचे पाणी बंद करु’, आमदार सुनिल शेळकेंचा इशारा..
महिन्याच्या आत पवना धरणग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावा, नाहीतर धरणाचे पाणी बंद करु’, आमदार सुनिल शेळकेंचा इशारा..
आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, २५ , नोव्हेंबर.
पुण्यातील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला चंद्रकांत पाटील आणि अजित पवार हेही उपस्थित होते.
पुणे येथे शुक्रवार (दिनांक 25 नोव्हेंबर) रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली.
मावळ तालुक्यातील पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्याकरिता जागा उपलब्ध नसल्याचे एकीकडे सांगितले जाते. तर दुसरीकडे इतर भागातील पुनर्वसित शेतकऱ्यांच्या नावाखाली एजंटांना मावळ तालुक्यातील जागा दिल्या जातात. याचा गांभीर्यपूर्वक विचार होऊन यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी,’ अशी मागणी सदर बैठकीत आमदार सुनिल शेळके यांनी केली.