नेपाळमधून दोन विशाल शालिग्राम शिळा अयोध्येत आणले जात आहेत. यापासून श्रीराम आणि माता सीता यांच्या मूर्ती बनवल्या जाणार आहेत.
जिथून शिळा जात आहेत तिथे लोक डोके टेकवत आहेत. फुले अर्पण करून शुभेच्छा देत आहेत.
नेपाळमधून दोन विशाल शालिग्राम शिळा अयोध्येत आणले जात आहेत. यापासून श्रीराम आणि माता सीता यांच्या मूर्ती बनवल्या जाणार आहेत.
जिथून शिळा जात आहेत तिथे लोक डोके टेकवत आहेत. फुले अर्पण करून शुभेच्छा देत आहेत.
आवाज न्यूज : वार्ताहर, २९ जानेवारी.
हे दोन्ही शिळा नेपाळमधील पोखरा येथे असलेल्या शालिग्रामी नदीतून (काली गंडकी) भूगर्भीय आणि पुरातत्व तज्ज्ञांच्या देखरेखीखाली काढण्यात आले आहेत. 26 जानेवारी रोजी ट्रकमध्ये भरले. पूजनानंतर दोन्ही शिळा ट्रकने रस्त्याने अयोध्येला पाठवण्यात येत आहेत.एका शिळाचे वजन 26 टन आहे तर दुसऱ्या शिळाचे वजन 14 टन आहे. म्हणजेच दोन्ही शिळांचे वजन 40 टन आहे.नदीच्या पात्रातून शिळा काढण्यापूर्वी धार्मिक विधी करण्यात आले. नदीची माफी मागितली. विशेष पूजा करण्यात आली. आता शिळा अयोध्येला आणल्या जात आहे. गाळेश्वर महादेव मंदिरात 26 जानेवारीला शिळांचा रुद्राभिषेकही करण्यात आला आहे.नेपाळमधील सीतामढीचे महंत दोन महिन्यांपूर्वी कारसेवक पुरम येथे रुद्राभिषेक करण्यासाठी आले होते. त्यांनीच ट्रस्टला शाळीग्राम शिळांची माहिती दिली. त्यानंतर या शिळा नदीतून बाहेर काढून अयोध्येत आणण्याचा कार्यक्रम ठरला. यामध्ये नेपाळ सरकारनेही सहभाग घेतला. शासनाच्या परवानगीनंतरच नदीतील शिळा काढण्यात आल्या आहेत.या शिळा शनिवारी जनकपूरला पोहोचत आहेत. दोन दिवसीय धार्मिक विधी होणार आहे. त्यानंतर दरभंगा, मुझफ्फरपूर मार्गे सहरघाट, मधुबनी, बिहारमधील बेनीपट्टी येथे शिळा पोहोचतील. त्यानंतर 31 जानेवारीला गोपालगंज मार्गे यूपीमध्ये प्रवेश करेल.