ताज्या घडामोडी
17 ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला सरकारची स्थगिती
मुंबई: शालेय शिक्षण विभागाने 17 ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्याच्या काढलेल्या आदेशाला सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे 17 ऑगस्ट पासून शाळा सुरू होणार नाहीत. टास्कफोर्सच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
शालेय शिक्षण विभागाने दोन दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग कमी झालेल्या ग्रामीण भागात आठवी ते बारावीचे वर्ग 17 ऑगस्ट पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.या संदर्भातील शासन निर्णय राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून काढण्यात आला होता.
बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांच्या मागणीवरून निर्णयाचा फेरविचार करत आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे.मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.