जांभूळ येथील रेल्वे भुयारी मार्गाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते उद्घाटन.
भुयारी मार्ग झाल्याने आंदर मावळमधील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
जांभूळ येथील रेल्वे भुयारी मार्गाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते उद्घाटन.
आवाज न्यूज : कामशेत प्रतिनिधी. १८ फेब्रुवारी.
आंदर मावळातील ४० गावांना जोडणा-या जांभूळ रेल्वे भुयारी मार्गाचे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. खासदार बारणे यांच्या पाठपुराव्यातून आणि खासदार निधीतून हा मार्ग तयार झाला आहे. भुयारी मार्गामुळे आंदर मावळमधील नागरिकांना आनंद व्यक्त केला.
कान्हे व जांभूळ रेल्वे गेट असल्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडथळा येत होता. फाटक बंद असल्यामुळे गाड्यांच्या रांगा लागायच्या त्यामुळे खासदार श्रीरंग बारणे यांनी भुयारी मार्ग करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सतत पाठपुरावा केला. रेल्वे विभागाकडून दीड कोटीचा आणि खासदार निधीतून ५० लाख असा दोन कोटी रुपयांचा निधी उभा करुन दिला. जांभूळ रेल्वे गट बंद करुन भुयारी मार्गाचे काम हाती घेतले.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, आंदर मावळातील ४० गावांना जोडणारा जांभूळ रेल्वे भुयारी मार्ग खुला केल्याने नागरिकांची मोठी सोय झाली. त्यासाठी २ कोटी रुपये खर्च केला आहे. याच पद्धतीने तळेगाव दाभाडे, शेलारवाडी, कामशेत याठिकाणी भुयारी मार्ग केले आहेत. रेल्वे फाटक येथे ओव्हर ब्रीजचे काम सुरु आहे. त्यामुळे नागरिकांचा रेल्वे फाटकावर थांबण्याचा वेळ वाचणार आहे. भुयारी मार्ग, ओव्हर ब्रिज होत असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
रिपाईचे नेते सूर्यकांत वाघमारे, शिवसेनेचे उपनेते इरफान सय्यद, माजी सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, सरपंच नागेश ओव्हाळ, उपसरपंच एकनाथ गाडे, शिवसेनेचे जिल्हा संघटक अंकुश देशमुख, माजी सरपंच नितीन कुडे, नगरसेवक प्रवीण चव्हाण, धनंजय नवघणे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख गिरीश सातकर, प्रवीण ढोरे, टाकवेच्या सरपंच सुवर्णा असवले, माजी सरपंच भूषण असवले, सागर आगळमे, ऋषीनाथ बो-हाडे, कल्पना काकरे, तृप्ती जांभूळकर, स्नेहल ओव्हाळ, रुपाली गायकवाड, रवींद्र गायकवाड आदी उपस्थित होते.