ताज्या घडामोडी
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय
मुंबई :मागील दोन आठवड्यांपासून दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. हवामान विभागानेही पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
शेतकऱ्यांना दिलासा
जून महिन्यात दमदार आगमन केल्यानंतर पावसाने दडी मारली होती.जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात पाऊस पडला नाही त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. परंतु आता पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
नागरिक सुखावले
मागील काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले होते.मात्र शुक्रवारपासून पावसाने हजेरी लावल्याने नागरिक सुखावले आहेत.