ताज्या घडामोडी

राज्यातील गणेशोत्सव जल्लोषातच साजरा होणार – राज ठाकरे

मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. या विरोधात गणेशोत्सव मंडळ संघटनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत राज्यातील गणेशोत्सव जल्लोषात साजरा होणार अशी ग्वाही राज ठाकरे यांनी दिल्याचे संघटनेचे अध्यक्ष हितेश जाधव यांनी सांगितले.

सरकारने गणेशोत्सवावर घातलेल्या निर्बंधांमुळे गणेशोत्सव मंडळ व मूर्तिकार नाराज आहे. सरकारने जाहीर केलेल्या नियमांना या उत्सव समितीचा आक्षेप आहे. त्यामुळे आपल्या समस्या मांडण्यासाठी व मुख्यमंत्र्यांपर्यंत आपले म्हणणे पोचवण्यासाठी संघटनेने कृष्णकुंजवर धाव घेतली. यावेळी येत्या दोन दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू असे आश्‍वासन ठाकरे यांनी दिले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!