ताज्या घडामोडी
यंदाचा बारावीचा निकाल ९९.६६ टक्के
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यंदाच्या वर्षी बारावीचा निकाल ९९.६६ टक्के लागला आहे.
विज्ञान शाखेचा निकाल ९९.४५ टक्के, कला शाखेचा निकाल ९९.८३ टक्के, तर वाणिज्य शाखेचा निकाल ९९.९१ टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९९.८१ टक्के असून सर्वात कमी निकाल औरंगाबादचा ९९.३४ टक्के आहे.