कार्ला मळवली रस्त्याच्या साईटपट्या वाढविण्याची मागणी,अरूंद रस्त्यामुळे वाहनचालकांची दमछाक,अपघाताची शक्यता
कार्ला : कार्ला -मळवली रस्त्याला साईटपट्या वाढविण्याची मागणी स्थानिक नागरीकांकडुन करण्यात येत असुन,अतिशय अरूंद रस्त्यामुळे पायी चालणे मुश्किल झाले असुन, या रस्त्याने पायी चालत असताना जीव मुठीत धरून चालावे लागत असुन वाहन धारकांना या रस्त्याने वाहन चालवताना मोठी कसरत करत वाहन चालवावे लागत आहे.
इंद्रायणी पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्याच्या बाजूला मोठे गवत वाढले आहे. त्यामुळे बाजुचा रस्त्याचा अंदाज येत नसल्याने, तसेच याठिकाणी असलेला इंद्रायणी नदीवरील पुल अंत्यत अरूंद आहे, वाहन चालक वाहन घुसडण्याचा प्रयत्न करत असतात, अरूंद रस्ता व अरूंद पुल यामुळे हा रस्ता अंत्यत धोकादायक झाला असुन छोटे मोठे अपघात सतत होत असताना, सार्वजनिक बांधकाम खात्याचे या रस्त्याचे ना रुंदीकरण केले जात की ना साईटपट्या वाढविल्या जात तसेच नवीन पुल बांधणीसाठी काही हालचाल होताना दिसत नाही.