तळेगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने योगी सरकारचा जाहीर निषेध
तळेगाव : भाजपच्या मंत्र्याच्या मुलाने 6 शेतकऱ्यांना गाडीने चिरडले. त्यामध्ये सहा शेतकरी मृत्यू पावले. त्यांचे सांत्वन करण्यासाठी प्रियांका गांधी वाद्रा या जात असताना योगी सरकारने पोलिस बळाचा वापर करून प्रियंका गांधी यांना अटक करण्याची धमकी देऊन धक्काबुक्की केली. याच घटनेमुळे तळेगाव शहर काँग्रेस कमिटीने योगी सरकारचा निषेध व्यक्त केला.
याप्रसंगी प्रास्ताविक राजेंद्र फलके यांनी केले.अमर खळदे यांनी भाषणामध्ये हे राम राज्य नसून रावण राज्य आहे आणि यांच्या तोंडात राम आचरणात नथुराम असे खडे बोल सुनावले.
लिगल सेलच्या वतीने अँड. सुधीर भोंगाडे यांनी निषेध नोंदवला. तळेगाव शहर काँग्रेस अध्यक्ष यांनी हाथरस प्रकरणाची आठवण करून योगी सरकार हे जुलमी सरकार आहे. या सरकारने न्यायव्यवस्थाचे धिंडवडे काढले आहेत असं मनोगत व्यक्त केल. तर आभार विशाल वाळुंज यांनी मानले.
याप्रसंगी तालुका अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, नरेश आगरवाल, विलास नांगरे, अभिषेक गोडांबे, प्रभाकर ओमकार अक्षय पोटे, संकेत खळदे ,महेश खळदे, भूषण खळदे,पंढरीनाथ मखांमले, अभिजित चौधरी,अमोल दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते