ताज्या घडामोडी
लखिमपूर घटना ; महाविकास आघाडीकडून 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक
मुंबई : उत्तर प्रदेशातील लखिमपुर खेरी येथे शेतकरी आंदोलन सुरू असताना सहा शेतकऱ्यांना गाडीने चिरडण्यात आले. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या घटनेबाबत खेद व्यक्त करत हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकार आक्रमक झाले आहे.सरकारकडून 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.