ताज्या घडामोडी

महीन्द्रा पिकअप गाडी लोणावळ्याजवळ अपघातात पलटी होऊन चालकासह दोन ठार

लोणावळा : महीन्द्रा पिकअप गाडीला आपघात होऊन चालकासह दोनजण जागीच ठार  तर पाच महिला व पाच लहान मुले यांचेसह २९ प्रवाशी जखमी झाले.

पीकअप चालक संदिप ज्ञानेदव भालके ( वय -४१, वर्षे, रा. कोठे बु।। ता.सगमंनेर जि.अहमदनगर ) आणि दिपक सुभाष कडाळे (वय-१८, पिंपळदरी ता. अकोले जि.अहमदनगर) असे दोनजण गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावले. यातील जखमी झालेल्या प्रवाशांची नावे १) अक्षय पंढरी कडाळे, २) अजय भाऊसाहेब कडाळे, ३) राकेष कडाळे, ४) निलेष कडाळे, ५) विजय षिवाजी मेंगाळ, ६) रेवन कडाळे, ७) अवदुत मधे, ८) अर्जुन कडाळे, ९) करण कडाळे, १०) संतोष पारधी, ११) विलास कडाळे, १२) प्रविण दिंगबर भगत, १३) विजय ज्ञानदेव कडाळे, १४) ओंमकार प्रकाष कडाळे, १५) लक्ष्मी कुंडलीक कडाळे १६) रेष्मा पारधी १७) काजल कडाळे,सर्व रा.पिंपळदरी ता. अकोले जि.अहमदनगर तसेच १८) अमोल सावळेराम दुधवडे रा. करजुले पठार ता.संगमनेर जि. अहमदनगर १९) करण सुदाम उघडे (वय १९ वर्षे, रा- गुंजाळवाडी ता.संगमनेर जि.अहमदनगर ) तसेच इतर 5 महीला व लहान 5 मुले ( यांची पूर्ण नावे व पत्ते माहीत नाही ) यांचा समावेश आहे.

पीकअप चालक संदिप भालके याने आपले ताबेतील पिकअप नं एम.एच/14/जी.यु/9227 हा जुना पुणे मुंबई महामार्गावर वलवण येथे आज पहाटे अडीच वाजता महामार्गावर भरधाव वेगात होता. तो मुंबई कडे द्रूतगतीमार्गावर चढताना उजवीकडे कठड्याला जोरात धडकून खाली पलटी झाला. लोणावळा शहर पोलिसांना खबर मिळताच पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांचे मार्गदर्शनाखाली घटनास्थळाकडे जावून जखमी झालेल्या प्रवाशांना खाजगी रूग्णलयात दाखल केले. या आपघातात दोन जणांचे मृत्यूस तसेच २९ लोकांच्या आपघातास कारणीभूत झालेले चालक भरधाव वेगात, हयगयीने,अविचाराने, रहदारीचे नियमांकडे दुर्लक्ष करून आपघातास कारणीभूत ठरल्याने पोलिसांनी शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक उंडे यांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक बावकर करीत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!