ताज्या घडामोडी
अवकाळी पावसाने रब्बी पीक धोक्यात ; शेतकरी चिंतेत
तळेगाव : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अवकाळी पाऊस कोसळत आहे. अवेळी पडणाऱ्या पावसामुळे रब्बीचे पीक धोक्यात आले असून शेतकरी चिंतेत आहे.
30 नोव्हेंबर पासून पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
अलीकडे झालेल्या पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाला आहे. गहू, हरभरा, ऊस या प्रमुख पिकांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. आता पुन्हा एकदा पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांचे चिंतेत भर पडली आहे.