भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन अखेर रद्द ;आघाडी सरकारला मोठा धक्का
दिल्ली : वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या सर्व 12 आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने अखेर रद्द केले आहे. त्यामुळे आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे.
विधानसभा अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्याने व असभ्य वर्तन केल्याने भाजपच्या 12 आमदारांचे पाच जुलै रोजी वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणी भाजपने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. कोर्टाने ऐतिहासिक निकाल देऊन भाजपच्या आमदारांचे निलंबन रद्द केलं. कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, एका अधिवेशनापेक्षा जास्त काळाचा निलंबन सभागृहाच्या अधिकारक्षेत्रात नाही असा निर्णय घेणं संविधानिक आहे.
सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारलं
दरम्यान 12 आमदारांच्या निलंबनावरून सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने ठाकरे सरकारला फटकारले. तब्बल एक वर्षासाठी आमदारांचे निलंबन करणे योग्य होणार नाही.कारण एका आमदाराचे निलंबन म्हणजे केवळ एकट्याच नव्हे तर त्या संपूर्ण मतदार संघाचे निलंबन होतं. त्यामुळे त्या मतदारसंघाला दिलेली ही एक प्रकारची शिक्षाच आहे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.