आवाज न्यूज : उत्तर प्रदेश,पंजाब,उत्तराखंड, मणीपूर आणि गोवा या पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. पंजाब वगळता इतर चारही राज्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पंजाब मध्ये आम आदमी पार्टीला बहुमत मिळाले आहे.
चारही राज्यांत भाजपची सत्ता कायम राहणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा पुन्हा एकदा दिसून आला आहे. निकालानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष व्यक्त केला. काँग्रेसचा मात्र या निवडणुकीत पूर्णपणे सुपडा साफ झाला आहे.