अंधश्रध्देचा कळस,वाकसईत स्मशानभूमित लिंबू भरलेल्या पाटीने खळबळ.
अंधश्रध्देचा कळस गाठला की काय असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
अंधश्रध्देचा कळस वाकसईत स्मशानभूमित लिंबू भरलेल्या पाटीने खळबळ.
आवाज न्यूज:लोणावळा ता.२४(प्रतिनिधी ) वाकसईत स्मशानभूमित लिंबू भरलेल्या पाटीने खळबळ माजली आहे. या घटनेने अंधश्रध्देचा कळस गाठला की काय असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
सहामासी निमित्त काही वाकसई ग्रामस्थ स्मशानभूमित नैवेद्य ठेवण्यासाठी गेले असता ; पाटीभर कापून त्यात गुलाल , लिंबाला टाचण्या , नारळ असे साहित्य मृतदेह अंत्यसंस्कार करतात , त्या लोखंडी जाळीसमोर ठेवलेले आढळले. या घटनेने वाकसईत आजूनही लोकांनी अंधश्रध्देचा पगडा सोडला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत लोणावळा ग्रामिण पोलिसांना विचारणा केली असता ;अद्याप कोणीही पोलिस स्टेशनला खबर दिली नसल्याचे प्रतिनिधीशी बोलताना सांगितले …
विज्ञान प्रगतीपथावर असताना , लोक चंद्रावर गेले ;पण अद्याप आंधश्रध्देचा पगडा कमी झाला नाही , आशी ग्रामस्थांमधे चर्चा रंगत असल्याचे दिसले.