तळेगाव शहर काँग्रेस कमिटी कडून आझाद गौरव यात्रा संपन्न.
देशाच्या अमृत महोत्सव स्वातंत्र्य वर्षी देशावरील गाणी रथयात्रेमध्ये लावण्यात आली होती.
तळेगाव शहर काँग्रेस कमिटी कडून आझाद गौरव यात्रा संपन्न.
आवाज न्यूज:प्रतिनिधी १४,ऑगष्ट
आझाद गौरव यात्रेची सुरुवात जिजामाता चौक येथून करून,सुभाष चौक, शाळा चौक, राजेंद्र चौक, तेली आळी चौक मारुती मंदिर मार्गे सुशीला मंगल कार्यालयात यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी देशाच्या अमृत महोत्सव स्वातंत्र्य वर्षी देशावरील गाणी रथयात्रेमध्ये लावण्यात आली.
याप्रसंगी बोलताना देविदास भन्साळी यांनी काँग्रेस पक्षाचे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी किती योगदान आहे हे सांगितले. मी सुद्धा स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा आहे असे त्यांनी सांगितले आत्ता लोक स्वतःच्या फायद्यासाठी पक्षांतर करतात पण ते फार काळ टिकत नाही ,काँग्रेस पक्षाने देशाला काय बलिदान दिले हे त्यांनी त्यांच्या भाषणातून सांगितले, स्वागत तळेगाव युवक अध्यक्ष विशाल वाळुंज यांनी केले, प्रास्ताविक तळेगाव शहरअध्यक्ष यादेवेंद्र खळदे यांनी केले, सूत्रसंचालन शुभांगी शिंदे यांनी केले, तर आभार माजी नगराध्यक्ष राजेंद्र पोळ यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी आमदार संजय जगताप ,आमदार संग्राम थोपटे ,निखिल कवीश्वर, चंद्रकांत सातकर ,बाळासाहेब ढोरे, विलास मालपोटे, गणेश काजळे पृथ्वीराज पाटील, श्रीमंत सरदार संध्याराजे दाभाडे, माऊली दाभाडे ,यशवंत मोहोळ ,विलास जाधव ,दिलीप कुल, वैष्णवी झगडे, शैलेश मखामले, राजेंद्र खळदे, अमर खळदे ,संकेत खळदे, भूषण खळदे ,शुभम खळदे ,आईशा खान निनाद हरपुडे, कौस्तुभ ढमाले, दिलीप ढमाले, विजय काशीद, अक्षय पोटे ,प्रभाकर ओंकार, आनंद मोरे, सुधीर भोंगाडे, संपत दाभाडे, हाजीमलंग मारिमुथू आदी मान्यवर उपस्थित होते.