२०२३ चा महाराष्ट्र केसरी पुण्याच्या राजगुरुनगरमधील शिवराज राक्षेने, अंतिम सामन्यात महेंद्रला चितपट करत मिळवला विजय..
दोघेही एकाच तालमीचे मल्ल.वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्या कात्रज येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल तालमीत दोघांनी कुस्तीचे धडे गिरवले आहेत.
२०२३ चा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे , अंतिम सामन्यात महेंद्रला चितपट करत मिळवला विजय..
दोघेही एकाच तालमीचे मल्ल..
आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, १४ जानेवारी..
मॅट विभागातून शिवराज राक्षेने तर माती विभागातून महेंद्र गायकवाडने विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती. ज्यानंतर फायनलमध्ये शिवराजने एकहाती विजय मिळवत महाराष्ट्र केसरी २०२३ होण्याचा मान मिळवला आहे.
पुण्यात रंगलेल्या ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पैलवान शिवराज राक्षे याने विजय मिळवत महाराष्ट्र केसरी २०२३ होण्याचा मान मिळवला आहे. अंतिम सामन्यात शिवराजने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला काही मिनिटातंच थेट चितपट करत विजय मिळवला आहे.
विशेष म्हणजे दोन्ही मल्ल हे पुण्याच्या तालमीतच तयार झाले आहेत. वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्या कात्रज येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल तालमीत दोघांनी कुस्तीचे धडे गिरवले आहेत. त्यामुळे वस्ताद काका पवार यांच्या शिष्याने यंदा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला.
महाराष्ट्र केसरी २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी माती आणि गादी विभागातील फायनलच्या स्पर्धेत शिवराज आणि महेंद्र यांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती. यावेळी आधी माती विभागातील अंतिम लढत झाली. ही अंतिम लढत अतिशय चुरशीची झाली. सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड, यांनी एकमेंकाना तोडीस तोड खेळ दाखवला. अखेरपर्यंत दोघेही एकमेंकावर भारी पडत होते. पण अखेर ६-४ अशा फरकाने महेंद्रने सिंकदरला मात देत फायनलमध्ये धडक दिली. दुसरीकडे मॅट विभागातील अंतिम लढत पुण्याच्या राजगुरुनगरमधील शिवराज राक्षे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात पार पडली. ही लढत फारच एकतर्फी झाल्याचं दिसून आलं शिवराजनं सुरुवातीपासून आपलं वर्चस्व सामन्यावर बनवलं आणि अखेर ८-१ अशा मोठ्या फरकाने सामना जिंकत फायनल गाठली.
पुण्यात मोठ्या उत्साहात महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे दिमाखदार आयोजन आणि प्रत्येक वजन गटात विजेत्यांना मिळणारी भरघोस बक्षिसे यामुळे ही स्पर्धा सुरुवातीपासूनच चर्चेत होती. संस्कृती प्रतिष्ठानचेवतीने संस्थापक अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.