ताज्या घडामोडी
राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा
पुणे : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा वाढल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने राज्यातील 15 जिल्ह्यांना पुढील पाच दिवसात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रायगड ,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना 11 सप्टेंबर रोजी यलो अर्लट देण्यात आला आहे. तर 12 सप्टेंबर रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, नंदुरबार, धुळे, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड या 12 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण तसेच घाटमाथ्यावरही पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.