ताज्या घडामोडी
या तारखेपासून राज्यातील शाळा सुरू होणार
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याने 4 ऑक्टोबरपासून शाळेची घंटा वाजणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याने कोरोना नियमांचे पालन करून शाळा सुरू होतील.
कोरोना रुग्ण संख्येत घट झाल्याने तसेच राज्यभरातील शिक्षक आणि शालेय कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाल्याने शाळा सुरू करण्याला मंजुरी देण्यात आली आहे.