ताज्या घडामोडी
शाळेची घंटा वाजणार, १५ जुलैपासून सुरू होणार वर्ग
मुंबई :राज्यातील शाळांची घंटा पुन्हा वाजणार असून कोरोना मुक्त क्षेत्रातील आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग १५ जुलैपासून सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.
राज्यातील कोरोना नसलेल्या क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्था/ ग्रामपंचायतीने ठराव करून कोरोना निकषांचे पालन करत आठवी ते बारावी चे वर्ग सुरू करण्यात शासन मान्यता देण्यात आली आहे.
शाळा सुरु होण्यापूर्वी जिल्हाधिका-यांनी शिक्षकांच्या लसीकरणाचे प्राधान्याने नियोजन करावे. विद्यार्थ्यांना शाळेत टप्प्याटप्प्याने बोलावण्यात यावे. एका बाकावर एकच विद्यार्थी असावा. दोन बाका मध्ये सहा फुटांचे अंतर असावे. पंधरा ते वीस विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश द्यावा अशा मार्ग दर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.