मावळाच्या पश्चिमभागात अवकाळी पावसामुळे भातपिकांचे नुकसान
लोणावळा : मावळाच्या पश्चिम पट्ट्यात अवकाळी पावसामुळे भातपिकांचे नुकसान झाले. भाताच्या वाळत ठेवलेल्या कडपे व येंगा पाण्यात भिजल्याने भाताचे पीक हातातोंडाशी आलेले गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
शेतकऱ्यांनी भिजलेल्या भातपिकांचे व चारा म्हणून वर्षभर गायी , बैलांची सोय असलेल्या पेंढ्याःचे भिजून नुकसान झाल्याने पाऊस उघडताच शेतकऱ्यांना शेतात जावून भात व पेंढा वाळवून नीट नेटके करण्यासाठी लगबग सुरू आहे. कित्येक शेतकऱ्यांनी भातपिकांचे नुकसान झाल्याने व शेतातच कामगत चालू असल्यामुळे या वर्षींची दिवाळी शेतकरी महिला व पुरूष यांची दिवाळी शेतातच काम करण्यात गेली.
चिखलमय शेतातून भातरोपे कापून ठेवलेली काढताना आंगाला लागलेला मातीचा वास हेच शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त उटणे लावल्याचे सुख म्हणावे लागेल.पावसाने भिजून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शेतातच पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी , अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.