महाराष्ट्रात पुन्हा कठोर निर्बंध लागू ;अशी आहे नियमावली
मुंबई : देशासह राज्यात कोरोणाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे.त्याचबरोबर नव्याने आलेल्या ओमायक्रॉनचा देखील प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून केले जात आहे.
रुग्णसंख्येत वाढ झाल्याने राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. नवीन निर्बंधानुसार विवाह सोहळ्यांसह कोणत्याही राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक समारंभात फक्त ५० जणांना परवानगी देण्यात आली आहे.अंत्यविधीसाठी केवळ २० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. तर परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनाला निर्बंध कठोर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पर्यटन स्थळे व चौपाट्या बंद करण्यात आले आहेत.
या संदर्भातील आदेश राज्य सरकारकडून गुरुवारी उशिरा जारी करण्यात आला आहे. सर्व निर्बंध आज शुक्रवारी मध्यरात्रीपासून अमलात येतील.