ताज्या घडामोडी

गोरगरिबांना आपल्या घासातला घास देता यावा! – रामदास काकडे

तळेगाव :“गोरगरिबांना आपल्या घासातला घास देता यावा! तर खऱ्या अर्थाने आपण प्रजासत्ताक झालो” असे आर एम के उद्योग समूहाचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक तसेच इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदासआप्पा काकडे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले.


२६ जानेवारी २०२२ रोजी ७३वा प्रजासत्ताक दिन इंद्रायणी विद्या मंदिराच्या प्रांगणात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलताना समारंभाचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी सांगितले की, भारताचा विकास करायचा असेल तर सर्वांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले पाहिजे. आपले मोठे ध्येय ठेवले पाहिजे. सर्वांना महत्त्व देऊन आपण सर्व एक आहोत हा भाव जपला पाहिजे. सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे. जर आपल्याकडे शांतता असेल,जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आशावादी असेल आपल्याकडे प्रयत्न करण्याची शक्ती असेल, तर कोणी गरीब राहणार नाही. सर्वांना योग्य प्रमाणात आर्थिक स्थैर्य मिळेल. आपण सर्व एक आहोत हा भाव आपल्या सर्वांच्या मनात रूजेल. विद्यार्थ्यांबरोबर आपण सर्वांनी आपला देश सुजलाम सुफलाम करण्यासाठी योगदान देऊ असे म्हणत याप्रसंगी त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मनोज फुटाणे, व्यवस्थापकीय संचालक, कला जनसेट यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे तसेच कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार, शैलेश शहा, श्री गणेश खांडगे श्री विलास काळोखे, संदीप काकडे, परेश पारेख, संजय साने आदी मान्यवर उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!