आनंदनगर ,साईबाबा नगर आणि दळवीनगर भागातील रेल्वेच्या हद्दीतील सुमारे दोन हजार घरांना जागा खाली करण्याच्या तीन नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली.माजी विधी समिती सभापती काळूराम पवार यांनी केली होती उच्च न्यायालयात याचिका दाखल!
पिंपरी चिंचवड: पिंपरीचिंचवड शहरातील आनंदनगर ,साईबाबा नगर आणि दळवीनगर भागातील रेल्वेच्या हद्दीतील सुमारे दोन हजार घरांना जागा खाली करण्याच्या तीन नोटीस ज्या अधिकाऱ्यांच्या सहमतीने पाठवलेल्या त्या सहायक मंडल इंजी(दक्षिण, लोणावळा) अमृत आनंद यांची मुंबई या ठिकाणी बदली करण्यात आली आहे यामुळे येथील घरांवर असलेली कारवाईची टांगती तलवार आता म्यानात गेली आहे.
आनंदनगर भागातील माजी विधी समिती सभापती काळूराम पवार यांनी आक्रमक भूमिका घेत रेल्वेच्या प्रशासनाच्या विरोधात मुबंई उच्च न्यायालयात ५० वर्षाचे नागरिकांचे आणि महापालिका प्रशासनाने केलेल्या पत्रव्यवहाराचे पुरावे सादर करून याचिका दाखल केली होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ज्या नागरिकांना नोटीस दिलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
आता रेल्वेचे अधिकारी असलेले अमृत आनंद याची मुंबईत बदली करून त्यांच्या जागी सुशांत कुमार यांची लोणावळा (दक्षिण) रेल्वे कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे.गेल्या वीस दिवसांपासून आंनदनगर, साईबाबा नगर आणि दळवीनगर येथील नागरिक रेल्वे प्रशासनाने पाठवलेल्या नोटीस मुळे तणावाखाली होते.
माजी विधी समिती सभापती काळूराम पवार यांनी या नागरिकांची बाजू उच्च न्यायालयात मांडून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे असलेले माजी विधी समिती सभापती काळूराम पवार यांनी या नागरिकांची बाजू उच्च न्यायालयात मांडून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असल्याचे दिसून आले. त्यांनी केलेल्या याचिकेमुळे रेल्वे अधिकारी अमृत आनंद यांची बदली झाली असल्याची चर्चा रेल्वेच्या पुणे कार्यालयात जोरदार पणे सुरू आहे.