विद्यार्थ्यांनी रोजगारक्षम कौशल्य आत्मसात करावीत -प्राचार्या प्रो डॉ जी डी इंगळे!
"रोजगारक्षम कौशल्य" या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेत उद्घाटन पर भाषणात बोलत होत्या!
अर्जुननगर: देवचंद महाविद्यालय येथे अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. रोजगार मिळवण्याची आजची स्पर्धा पाहता विद्यार्थ्यांनी परीक्षेचे शिक्षण पूर्ण करत असतानाच विविध रोजगारक्षम कौशल्ये आत्मसात करावीत असे मत देवचंद कॉलेजच्या प्राचार्य प्रो डॉ जी डी इंगळे यांनी व्यक्त केले . शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अग्रणी महाविद्यालय योजना अंतर्गत देवचंद कॉलेज येथे प्लेसमेंट कमिटीच्या वतीने आयोजित ‘रोजगारक्षम कौशल्य ‘या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेत उद्घाटन पर भाषणात त्या म्हणाल्या की विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणच्या रोजगाराच्या संधींची माहिती करून घेणे आणि त्यासाठी आवश्यक असलेली कौशल्य विकसित करून आत्मनिर्भर होणे ही आजची काळाची गरज आहे. त्यामुळे कौशल्य विकास आणि प्रशिक्षणातून रोजगार मिळवणे सुलभ होते.
यावेळी पहिल्या सत्रात सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. एस .एस .पाटील यांनी रोजगारक्षम कौशल्य या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी आत्मविश्वास, आत्म प्रेरणा ,समूह कार्य ,वेळेचे व्यवस्थापन, संवाद कौशल्य याबाबत सखोल मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात आयसीआयसीआय बँक मुंबई येथील एच आर मॅनेजर श्री पंकज तिलवे यांनी बँकिंग क्षेत्रातील रोजगाराच्या संधी आणि विद्यार्थ्याकडे आवश्यक असलेले ज्ञान आणि कौशल्य याबद्दल सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. आरती नाडगौडा यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केली. त्यांनी अग्रणी महाविद्यालय योजनेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . डॉ. ए.ए. रामटेके यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉ संतोष यादव यांनी आभार मानले. कु निकिता भोसले हिने सूत्रसंचालन केले. यावेळी देवचंद कॉलेज अर्जुननगर अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. उपप्राचार्य प्रो डॉ. पी पी शाह, डॉ. विजय गायकवाड व रमेश कुंभार हेही उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ सौ. तृप्तीभाभी शाह व प्राचार्या प्रो.डॉ. जी डी.इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले.