ताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

देवचंद कॉलेज अर्जुननगर येथे दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन!

"रासायनिक विज्ञानामधील भविष्यातील दृष्टिकोन आणि नावीन्यपूर्ण संकल्पना" या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद

Kiran G.Patil M.No.8884357516


दि. 16 फेब्रुवारी 2024 : रसायनशास्त्र विभाग देवचंद कॉलेज, अर्जुननगर येथे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अर्थ सहाय्यित “रासायनिक विज्ञानामधील भविष्यातील दृष्टिकोन आणि नावीन्यपूर्ण संकल्पना” या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद दि.16 आणि 17 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित केला होता.

सदर परिसंवादासाठी कर्नाटक व महाराष्ट्रातील विख्यात विद्यापीठांमधून प्रमुख वक्ते आले होते. परिसंवादाच्या पहिल्या दिवशी शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. पी एस पाटील यांनी सदर परिसंवादाचे उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह हे उपस्थित होते. सदर परिसंवादामध्ये सादर केलेल्या संशोधन पत्रिकांची स्मरणिका प्रकाशित करण्यात आली.

परिसंवादासाठी देशभरातील विद्यार्थी ,शिक्षक व संशोधकांना आमंत्रण देण्यात आले होते.या परिसंवादाच्या यशस्वी उद्घाटन समारंभ नंतर मुंबईचे प्रो. चंदन व बुलढाणा येथील प्रो. चांडक, तसेच शिवाजी विद्यापीठातील प्रो. गरडकर यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.आयोजनासाठी प्राचार्या ,समन्वयक व रसायनशास्त्र विभागातील प्रा.बी.गुरव , डॉ.ए.ए.रामटेके ,डॉ.एस.ए.केनवडे, प्रा. डॉ एस. के .पाटील ,कु. रेश्मा धुमाळ ,कु.अस्मिता पाटील यांनी परिश्रम घेतले.

सदर परिसंवादात रसायनशास्त्र विषयांमध्ये सद्यस्थितीत सुरू असलेल्या संशोधनाचा व नाविन्यपूर्ण संकल्पनांचा आढावा घेतला गेेला. प्रशिक्षण मंडळाचे खजिनदार सुबोधभाई शाह , महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो.डॉ.जी.डी.इंगळे व परिसंवादाच्या समन्वयक प्रो. डॉ. सविता धोंगडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!