अर्जुननगर एम. डी. विद्यालयात कृषी सप्ताह संपन्न!
कागलचे कृषी पर्यवेक्षक श्री प्रमोद शिंगे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते!
निपाणी नगरी प्रतिनिधी (7) अर्जुननगर
येथील मोहनलाल दोशी विद्यालय मध्ये दिनांक 1 जुलै ते 7 जुलै कृषी सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी कृषी विषयातील करिअरच्या संधी या विषयावर कागलचे कृषी पर्यवेक्षक श्री प्रमोद शिंगे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी बोलताना शिंगे म्हणाले “ॲग्रीकल्चर हेच आपले कल्चर आहे ते आपण जपले पाहिजे, लोकांनी शेतकऱ्यांना मानसन्मान द्यावा सुशिक्षित तरुणांनी शेती व्यवसायाकडे वळावे व सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून विविध नवप्रयोग करून कडधान्ये, औषधी वनस्पती लागवड करावी. फलोत्पादन तसेच पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, भाजीपाला व फळ प्रक्रिया इ. जोड व्यवसायांच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधावी”
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जनता शिक्षण मंडळाचे विश्वस्त श्री प्रकाशभाई शाह हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते स्कॉलरशिप परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व पालकांचा तसेच वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक मुख्याध्यापक श्रीमती एस एम गोडबोले यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांची ओळख आर डी देसाई यांनी करून दिली तर सूत्रसंचालन एस व्ही पाटील व आभार एस एस मगदूम यांनी मानले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक आर डी पाटील शिक्षक प्रतिनिधी ए डी लकमले कर्मचारी प्रतिनिधी एस आर भोपळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कृषी सप्ताह यशस्वी होण्यासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह, उपाध्यक्षा तृप्तीभाभी शाह, खजिनदार सुबोधभाई शाह यांचे मार्गदर्शन लाभले.