देवचंद कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात संपन्न.!
कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सर्व गुरुजनांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले!
महाविद्यालयातील कनिष्ठ वाणिज्य विभागामार्फत बारावीच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थिनीने सर्व गुरुजींना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले आणि गुरुप्रती आपले मत व्यक्त केले. गुरुविण कोण दाखवील वाट या शब्दा प्रमाणे प्रत्येक गुरु विद्यार्थ्यांना ज्ञानदाना प्रमाणेच आयुष्य जगण्यासाठीची दिशा दाखवत असतात.
या कार्यक्रमासाठी वाणिज्य शाखेचे प्रमुख बी एस कुंभार व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रमुख एस.ए.पवार, श्री नितीन कोले, सौ एन ए पाटील, सौ, आरबोळे, महेश दिवटे, योगेश पाटील शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रस्ताविक कुमारी अर्चना पटेकरी हिने केले तर आभार आरती मोरे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.जे डी इंगळे, तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ. एस पी जाधव तसेच पर्यवेक्षक डोनर यांचे मार्गदर्शन लाभले.