निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ही काळाची गरज- प्रा.डॉ. जी. डी. इंगळे
(Devchand College) देवचंद महाविद्यालयात 'वृक्षारोपण' कार्यक्रम संपन्न,
निपाणी नगरी प्रतिनिधी अर्जुननगर :(2)
देवचंद महाविद्यालयाच्या परिसरात कोनाकारपस, फायकस, ड्युरांडा आदी देशी, शोभिवंत अशा वृक्षांचे रोपण प्राचार्या प्रो. डॉ.जी.डी.इंगळे यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
मानवी विकासात निसर्गाचे फार मोठे योगदान आहे. प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंदिन गरजांची पूर्ती करणारा वृक्ष आजही मानवी जीवन आणि समाजाच्या अस्तित्वाच्या संदर्भात महत्वाची भूमिका बजावीत आहे. जगभरात विकासाच्या नावाखाली अनेक झाडे तोडल्यामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे. आपल्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी उभे असणारे वृक्ष आपले जीवन दाते आहेत म्हणून आपण वृक्षांची काळजी घेतली पाहिजे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन देवचंद महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. जी. डी. इंगळे यांनी केले.
या उपक्रमासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह यांची प्रेरणा मिळाली. पर्यवेक्षक डॉ. अशोक डोनर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय परिसरात एन.सी.सी. विभाग, व्हाइट आर्मी विभाग, एन.एस.एस विभाग व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले.
यावेळी श्रीमती एस. पी. जाधव उप प्राचार्या कनिष्ठ विभाग, डॉ.ए.एस.डोनर पर्यवेक्षक कनिष्ठ विभाग, डॉ. सी. एम. नाईक इतिहास विभाग प्रमुख, डॉ. आर. जी. चव्हाण जिमखाना विभाग प्रमुख आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी श्री. आर. एस. कुंभार, श्री. व्ही. पी. पाटील, श्री. टी. ए.पाटील, श्री.ए. ए. कुराडे, श्रीमती आर. एस. सोकासने, श्रीमती ए. ए. साळुंखे, विकास कोरे, यांच्यासह सर्व शिक्षकवृंद , शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.